नमस्कार मित्रानो!
आज आपण अशा वेळी भेटत आहोत की सर्वच आर्थिक संस्था, जसे आपली बँक सुद्धा यात मोडते , आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे आणि सर्व जण व्यस्त असाल . मागील लेखामध्ये आपण ग्राहकाभिमुख सेवा कशी आपल्या हिताची आहे याविषयी चर्चा केली, व ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सर्वच विभाग कशी तत्पर सेवा देऊ शकतात याविषयी ऊहापोह केला होता., आणि त्याचा सर्वागीण बँकेच्या प्रगती साठी उपयोग होत असतो, हे देखील पाहिले . बँक कारभार हा दोन खांबावर मजबूत पणे चालतो ते म्हणजे कर्ज वितरण आणि बँकेतील ठेवी. प्रत्येक बँकेसमोर दोन्हीचा योग्य समतोल साधणे हे मोठे आव्हान असते , आणि ह्या सर्वाचा लेखाजोखा वर्षअखेरीस म्हणजेच आर्थिक वर्ष संपताना मांडला जातो, आणि त्यावरच बँकेचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाने वर्षाच्या सुरवातीस त्यांना नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करणे स्वाभाविक असते. कुठेही कमी पडत असेल तर त्यामुळे बँकेच्या एकंदर व्यवसायावर आणि ताळमेळ वर परिणाम होतो अशा परिस्थितीत जर योग्य पाऊल उचलली नाहीत तर वर्षभराची संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे सर्वावर कामाचा ताण अधिक वाढू शकतो.
बँकेचे उत्पन्न आणि खर्च ह्यावर नफा अवलंबून असतो त्यामुळे जेवढा नफा अधिक आणि खर्च कमी तेवढा जास्त चांगले कारण ज्या भागधारकांनी विश्वासाने बँकेच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना त्याप्रमाणे लाभांश वितरित करू शकतो. त्यामुळे थकीत कर्ज वसुली जोमाने केली जाते कारण त्यामुळे NPA ratio कमी होतो. यावेळी वसुली अर्थात रिकव्हरी विभागावर मोठा ताण असतो. आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या ग्राहकांना न दुखावता कर्जाची वसुली करणे एक मोठे आव्हान असते, हितसंबंध पण सांभाळायचे असतात अशा प्रसंगी, शांत डोक्याने संयम बाळगुन काम करावे लागते आणि, योग्य पद्धतीने संवाद करावा आणि काम करावे, कुठेही आवाज न वाढवता आपले उद्दिष्ट साध्य करावे. जेवढे NPA(Non performing Assets) कमी तेवढे आपल्या सर्वांच्या दृष्टीने हिताचे व आपण RBI च्या निर्बंधापासून दूर राहतो,ही बाब सर्व कर्मचारी, ग्राहक आणि संचालक मंडळानी लक्षात घेतली पाहिजे.
बँकेची आर्थिक स्थिती जेवढी मजबूत तेवढे व्यवसाय वृद्धीसाठी वाव असतो. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक आणि मुदत ठेवी मिळवणे, ह्यासाठी पण आपल्या ला सतर्क रहावे लागते, त्यासाठी जर वरिष्ठांकडून सूचना आली तर त्यासाठी आपल्या ग्राहकांना सूचित करणे,व त्याप्रमाणे त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करावे लागते,मित्रानो ह्यासाठी आपण वर्षभर चांगल्या सेवेची पेरणी केलेली असेल की तर त्याचा निश्चित फायदा होतो.
कुठलेही काम वेळच्या वेळी केले की शेवटी त्याचा ताण येत नाही हे सर्वांना माहीत आहे पटते पण...काही वेळा चालढकल केली जाते आणि मग ऐनवेळी एकदम सर्व कामे करून ते पण काम करावे लागते ,अशा वेळेस, कामाचा ताण येतो,आणि मग उशीरपर्यंत थांबणे, जास्त काम करावे लागते आणि ते टाळता येत नाही.
ऑडिट टीम कडून काही अहवाल,गोष्टींची मागणी केली जाते त्या ही वेळच्या वेळी पूर्ण कराव्या लागतात,कारण बँकेला सुद्धा RBi ला र काही अहवाल , माहिती वेळेत देणे आवश्यक असते
एकंदर सर्व काही वेळेवर करून सुद्धा काही त्रुटी वर्षभरात राहू शकतात अशावेळी ,चिडचिड न करता ,शांत पणे संयम ठेऊन काम करावे,कारण त्या पासून पळवाट नसते हे लक्षात घेतले पाहिजे.
आज जवळ जवळ सर्व च सहकारी बँकेमध्ये ऑनलाईन व्यवहार पण होतात,आणि त्या संगणकीय व्यवस्थेवर जास्त कामाचा ताण येऊ शकतो,सर्वर कधी कधी down होऊ शकते, किंवा त्याची गती कमी होते,अशा वेळेस बँकेतील IT विभागाकडे वारंवार सिस्टम पूर्णपणे कार्यरत राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे,जास्त काम अपेक्षित धरून योग्य ती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून शेवटच्या दिवसापर्यंत काम सुरळीत आणि योग्य गतीने चालू राहील.
आता मित्रानो सर्वात महत्वाचे ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या मासिक उत्सवात काय उपाययोजना किंवा काय करावे यासाठी काही अनुभवाचा उपयुक्त सल्ला येथे दिल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.
वर्षअखेरीचा कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी येथे काही टिप्स :
सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या:- *पुरेशी झोप घ्या*( घरी) लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी ७-८ तास झोप घेण्याचे ध्येय ठेवा.
- *पौष्टिक आहार घ्या*: ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक अन्नाने शरीराला ऊर्जा द्या.आणि वेळेवर खा. वडा पाव नाही,एक संध्याकाळचा अधिक नाश्त्याचा घरगुती डबा आणण्यास सुरू करा कारण नेहमीपेक्षा जास्त थांबावे लागते.
- *विश्रांती घ्या*: ताण कमी करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी विश्रांतीचा वापर करा. काम चालुच राहील, मध्ये छोटा पाच दहा मिनीटची छोटी सुट्टी,बँकेच्या बाहेर एक चक्कर मारून या,सहकाऱ्यांशी मोकळेपणे बोला.
वास्तववादी ध्येये निश्चित करा*: दिलेल्या वेळेत काय साध्य केले जाऊ शकते याबद्दल वास्तववादी रहा.
संबंधित व्यक्तींशी संवाद साधा: अपेक्षांचे व्यवस्थापन करा आणि आवश्यक असल्यास अंतिम मुदतीवर वाटाघाटी करा.
- *सर्वाधिक परिणाम करणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा*: जास्तीत जास्त परिणाम घडवून आणणाऱ्या कामांना प्राधान्य द्या.तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करा
- *पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामे स्वयंचलित करा*: मॅन्युअल प्रयत्न आणि चुका कमी करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर करा.
- *संघटित रहा*: कागदपत्रे आणि माहिती व्यवस्थित आणि सहज उपलब्ध ठेवा.
लक्ष केंद्रित ठेवा:- *विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करा सोशल मीडिया, ईमेल आणि अनावश्यक बैठका मर्यादित ठेवा.
लक्ष केंद्रित करून काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि व्यत्यय कमी करा.
शरीरात पाण्याची पातळी आणि ऊर्जा टिकवून ठेवा- लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी पाणी प्या आणि विश्रांती घ्या.
मी इथे हे मुद्दे मांडत आहे कारण ह्या महत्वाच्या काळात सर्वांनी योग्य तयारी ने मार्च महिन्यात काम केले तर धावपळ होणार नाही आणि, आपण बँकेच्या प्रगतीसाठी मोलाचा सहभाग देऊ शकतो व ह्या यशामध्ये आपलाही कर्मचारी म्हणून खारीचा पण मोलाचा वाटा देऊ यात.
सर्वांना माझ्यातर्फे ह्या आर्थिक क्षेत्रातल्या कुंभ मेळ्याच्या (31 मार्च वर्षअखेर) उत्सवाच्या )पुन्हा एकदा शुभेच्छा!
शिरीष शरद पाटील
व्यवसाय वृद्धी प्रशिक्षक आणि सल्लागार
पुणे
98903 33611